नाशिक :- पखाल रोडवरील,महात्मा फुले समाज शिक्षण संस्था संचलित मातोश्री सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात संविधानिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि नागरिक हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले.यात २९५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.समाजातील प्रत्येक घटकाला घटनेने दिलेले अधिकार आणि स्वातंत्र्य यांची आठवण व्हावी.यासाठी मानवी साखळीद्वारे उद्बोधन करण्यात आले.'संविधान मूल्यांचा विजय असो' 'सामाजिक न्यायाचे रक्षण करूया'अशा घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. संविधान आणि त्यातील तरतुदींविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी साखळीचे आयोजन मुख्याध्यापक गजानन घरटे, यांनी केले.मानवी साखळी यशस्वी होण्यासाठी पर्यवेक्षक निवृत्ती कमोदकर,जयश्री नेरकर,सरला गायधनी,संजय साळवे,समाधान घरटे,हेमलता पगारे,विजया पगार,गोकुळ माळी,हर्षद गांगुर्डे,तुषार घोटेकर,यांसह आदींनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या